ठाणे : ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत आतापर्यंत शिवसेनेनं ७, भाजपनं २ तर 2 काँग्रेस आणि अपक्ष एका जागी विजयी झालेत. 


यादीतील घोळ आणि तांत्रिक बिघाड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, 38 शेलार गण मतदार यादीतील घोळ आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याठिकाणी मतमोजणी होणार नाही. तसंच त्याठिकाणी फेर निवडणूक होणार आहे. 


भाजप विरुद्ध शिवसेना


ठाणे जिल्हा परिषदेच्या ५२ जागांसाठी ५ ठिकाणी मतमोजणी होतेय. त्यासाठी साडे पाच हजार अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत. भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना निवडणुकीत रंगलाय. 


भाजपला जोरदार धक्का


दरम्यान, अंबरनाथ तालुका पंचायत समिती शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या ताब्यात.एकूण आठ जागांपैकी ६ जागांवर विजय मिळवलाय. भाजपाकडून शिवसेना -राष्ट्रवादीने पंचायत समिती ताब्यात  घेतली आहे.