कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचं छत कोसळले. शाळेत विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर मुलांना शाळेत न पाठवण्याचा पालकांनी निर्णय घेतला आहे. वाघवे गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे छत कोसळेले त्याआधी शाळा सुटली होती. त्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली. जे शाळेचे छत कोसळले त्या खोलीत पहिलीचा वर्ग बसत होता. त्यामुळे लहान मुलांच्या जीवावरचा धोका टळला. 


दरम्यान, मोडकळीस आलेल्या शाळेत पहिलीची मुले बसविण्यात येत असल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने मोठी हानी टळली. शाळेत मुले असती तर मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे गावातील नागरिकांनी शाळेत मुले न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.