जळगाव : मोबाईल क्रमांक मिळवून जळगावात सधन, शेतकरी, व्यापारी तसंच धनिक लोकांना लुटणारी महिलांची टोळी रामानंदनगर पोलिसांनी अटक केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी याप्रकरणी ३ महिला, ३ पुरुष तसंच एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलंय. यावल तालुक्यातील नावरे गावातील शेतकरी निलेश बापू पाटील हे कामानिमित्त जळगावात आले असताना त्यांच्या मोबाईलवरून एका महिलेनं संपर्क साधला त्यांना गोड बोलून हुडको परिसरात नेले. 


तिथे घरात घुसल्यानांतर तिघा गुंडांनी पाटील यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कसाबसा घरातून पळ काढून स्वतःची सुटका करून घेतली. त्यांनी याबाबत रामानंद नगर पोलिसांत तक्रार दिल्यांनतर या महिला टोळीचा शोध घेऊन कारवाई करण्यात आली.