औरंगाबाद, नाशिक : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात जांभळा येथे भीषण अपघातात दोन ठार तर एक जण जखमी झाला आहे. तर दुसऱ्या एका अपघातात नाशिकहून शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पालखीला झालेल्या अपघातात एका साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद येथील अपघातात मृत्यू झालेले दोघे हे बुलढाण्याचे रहिवासी होते. आज रक्षाबंधन असल्याने ते बहिणीच्या गावाला नाशिक येथे जात होते. मात्र गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार  ट्रकच्या मागच्या भागात घुसली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


तर नाशिकहून शिर्डीला साईंच्या दर्शनासाठी जाणाऱ्या पालखीला झालेल्या अपघातात एका साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला. तर एक साईभक्त गंभीर जखमी झाला आहे. नाशिकच्या भद्रकाली येथील खालसा ग्रुपचा हा पायी पालखी सोहळा निघाला होता. पालखी सोहळ्यात मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. कारने अनेकांना चिरडले. यात काहीजण किरकोळ जखमी झालेत.