नाशिक: एकाच घरातील तिघांची क्रूर हत्या करण्यात आल्याने नाशिकमध्ये जोरदार खळबळ उडाली आहे. नाशिकच्या घोटी जवळील खेड भैरव या गावात एकाच घरातील तिघांची हत्या करण्यात आली. हिराबाई चिमटे, मंगला चिमटे आणि पाच वर्षाचा रोहित चिमटे अशी हत्या करण्यात आलेल्यांची नावे आहेत.


पोलिसांकडून संशयीताला अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अत्यंत गंभीर अशा या घटनेमुळे घोटी परिसर हादरून गेला आहे. घोटी पोलिसांनी या प्रकरणात संशयित आरोपी सचिन चिमटे याला अटक केली आहे. सचिन हा हिराबाई आणि मंगला चिमटे यांचा चुलत पुतण्या आहे. दरम्यान हत्येचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही. चिमटे कुटुंबियांनी सचिनला फासावर लटकवण्याची मागणी केलीय.


साताऱ्यातही धक्कादायक घटना


दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्येही वराडे इथं घरगुती वादातुन मुलाने आई आणि पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केलाय.  या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झालाय. या घटनेनंतर मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. सागर सदाशिव घोरपडे असं या हल्लेखोर मुलाचं नाव आहे. तर मोहिनी सागर घोरपडे असं हल्ल्यात मृत झालेल्या पत्नीचे नाव आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तोसुद्धा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी उंब्रज पोलीस अधिक तपास करतायत.