अहमदनगर : ऑटोरिक्षाला लागलेल्या आगीत दोन लहानग्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नगर जिल्ह्यात नेवासे तालुक्यात घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवरासंगम येथे मध्यरात्री ही घटना घडली. नमीरा आणि महेवीश किरेशी अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत. 


औरंगाबाद येथील कुरेशी कुटुंब चांदा गावात साखरपुड्यासाठी आले होते, परतत असताना ऑटोरिक्षाने अचानक पेट घेतल्याने ही दुर्घटना घडलीय. 


या दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.