नाशिक : ऐन गणेशोत्सव काळात नाशिक शहरात दोन दिवसात खुनाच्या दोन घटना घडल्यात. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनराज परदेशी या तरुणावर रविवारी दोन ते तीन जणांनी धारधार शस्त्रांनी हल्ला केला होता. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडा भुर्जीची गाडी लावण्यावरून धनराजचा भूषण कदम याच्याशी वाद होत होता. याचा करणावरुन खून झाल्याचा संशय पोलीस व्यक्त करताहेत. 


ही घटना ताजी असतानाच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोष कडाळे याच्यावर गणेश जाधवनं किरोकोळ भांडण झाल्यानं चाकू हल्ला केला त्यात संतोषचा मृत्यू झाला असून गणेश जाधवला पोलिसांनी अटक केलीय. 


भद्रकाली घटनेतील आरोपी आणि मयत दोन्ही गर्दुल्ले होते तर सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संशयित हा अट्टल गुन्हेगार आहे.