अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील कनोली गावातील चुलत सासू-सुनेचा डेंग्यू सदृश आजारानं मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडालीय. तर याच परिसरातील सुमारे १३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. 


या सर्व रुग्णांवर संगमनेरमधील विविध खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. 


चहाबाई वर्पे आणि सुमनवर्पे  या चुलत सासू-सुनेचा डेंग्यूसदृश आजारानं नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.