Uddhav Thackeray: महाराष्ट्रात दौऱ्याला सुरुवात करताना पवित्र स्थळापासून सुरुवात करावी असे वाटत होते. म्हणून पोहोरादेवीचे दर्शन घेऊन  दौऱ्याला सुरुवात केली आहे. पण जिथे जातोय तिथे लोकं भेटून आपण सोबत असल्याचे सांगत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणीही मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना काय मिळतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. पाऊस अजूनही पाहिजे तसा सुरु झाला नाही. पिकवीमा योजना, शेतकरी कर्ज, पिकाचा हमी भाव यासंदर्भात आम्ही काम करत होतो. दुर्देवाने करोना आला. त्यानंतर माझी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर हुडी घालून बैठका सुरु झाल्या. त्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला हवे होते. 


अमित शहांच्या भेटीबद्दल त्यांनी भाष्य केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे ठरले होते ही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो,असेही ते म्हणाले. ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे सेना-भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपच्या नेत्यांना सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 


आता मी दौऱ्याच्या ठिकाणी जाहीर सभा घेत नाही. शेतकरी आता शेतीच्या कामात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. 


सुप्रीम कोर्टाने  शिंदे गटाच्या आमदारांसंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. 


शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. मेहनत करणाऱ्यांना संधी मिळते, असे ठाकरे म्हणाले.