अहमदनगर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकेची तोफ डागली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट असल्याचा आरोप करत राज्याला स्वतंत्र आणि पूर्णवेळ गृहमंत्री हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलीय. फडणवीस सरकार निष्क्रीय असल्याचा घणाघाती आरोपही त्यांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. खरे आरोपी अजूनही मोकाट असून खटला जलदगतीने चालवण्याची मागणी त्यांनी केलीय. तसंच हा खटला लढण्यासाठी विशेष सरकारी उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. 


दरम्यान, ज्या दोन कुटुंबीयावर संकट कोसळलेय. त्यांची जबाबदारी  शिवसेनेची आहे. शिवसेना दोन्ही कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.