COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर : पाणी सोडले नाही म्हणून उल्हासनगरमध्ये वॉचमनची हत्या करण्यात आलीय. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर दोन परिसरातल्या मेनका पॅलेस इमारतीत ही घटना घडली. वॉचमननं इमारतीत पाणी सोडलं नाही आणि इतर कामांमध्ये उशीर केल्याच्या रागातून सोसायटीचा सेक्रेटरी विकी तलरेज यानं वॉचमन विकास सोनार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच विकी थांबला नाही. त्यानं अखेर विकास सोनार यांची गळा दाबून हत्या केली.


सोमवारी सकाळी वॉचमन विकास हा उशीर उठला. इमारतीचा सेक्रेटरी विकी यानं वॉचमन विकास याला पाणी का सोडले नाही आणि इतर कामे का नाही केली याचा जाब विचारला. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली विकीनं विकासला मारहाण करीत त्याचा गळा दाबला. यात विकासचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी विकास याच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी विकी ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.