पुणे : नेहमीच वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री गिरीष बापटांनी यावेळी भाजपला अवाक् करणारं विधान केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सत्तेत असलो तरी पुढं काय होणार आहे, हे आपल्याला माहित आहे. वर्षभरानंतर सत्ता बदलणार आहे, असं धक्कादायक विधान गिरीष बापट यांनी पुण्यातल्या डाळिंब परिषदेत केलंय. 


काय घ्यायचं असेल ते आताच घ्या, पुढं काय होईल ते आपल्याला माहित आहे? असं सांगत भाजप पुन्हा सत्तेत येण्याबाबत बापटांनी संशय व्यक्त केला. यामुळं उपस्थितांसह भाजपलाही बापटांनी अवाक् केलंय.