जालना : जालन्यातील औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर आज कलिंगडची वाहूतक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने कलिंगडने भरलेला ट्रक रस्ताच्या बाजूला पलटी झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबड तालुक्याली डोमेगाव फाट्यावर ही घटना घडली. ट्रक उलटल्याने त्यातील कलिंगड रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला. पण त्याला मदत करण्याऐवजी महामार्गावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी कलिंगड लुटायला सुरुवात केली.


ही बातमी काही क्षणाताच वाऱ्या सारखी पसरली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांची तिथे एकच गर्दी झाली. मिळेल तितकी आणि जमेल तितकी कलिंगड घेऊन लोकं तिथून पसार झाली. काही जणांनी तर कलिंगड नेण्यासाठी मोठमोठ्या गोण्याही आणल्या होत्या. बघता बघता सर्व कलिंगड घेऊन लोकं गायब झाली.


जखमी अवस्थेतही ट्रक चालक लोकांना विनवणी करत होता, पण लोकांनी ना त्याला मदत केली ना त्याच्या विनवणीकडे लक्ष दिलं. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यान ट्रक चालकाना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.