नागपूर : गेल्या तीन वर्षात एकाही शेतक-याची वीज कापली नाही, असं  ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधान परिषदेत सांगितलं.४ वर्षात ४० लाखांपैकी ९ लाख शेतकऱ्यांनी वीज बील भरलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थकबाकीदार शेतकऱ्यांनी केवळ ३ हजार रुपये भरून बाकीची रक्कम ५ हप्त्यामध्ये भरण्याची सवलत देण्यात आली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.


वीज वितरण कंपनीला ट्रान्सफॉर्मार आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तसेच नवीन कामासाठी ३ हजार कोटींची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतक-यांच्या वीज बील वसूली बाबतच्या चर्चेवर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बहिष्कार घातला.