औरंगाबाद : चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या रागातून पत्नीनेचं पतीचा २ लाख रूपयाची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा परिसरातील छत्रपती नगरामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेकटा शाखेचे व्यवस्थापक जितेंद्र नारायण होळकर यांचा गळा चिरून खून करण्यात आला होत. शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.मात्र, या खुन्याचा शोध अवघ्या २४ तासांमध्ये औरंगाबादच्या गुन्हे शाखेने लावला आहे. 


पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी कारवाई करीत सुपारी देणारी पत्नी, मध्यस्थ असलेला एका राजकीय पक्षाचा नेता आणि प्रत्यक्ष खून करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. 


गेल्या दीड महिन्यापासून हा खून करण्यासाठी प्लॅनिंग सुरू होते. होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर हिने २ लाख रुपये देऊन खून करण्याचा डाव रचला. ठरल्याप्रमाणे १० हजार रुपये ऍडव्हान्स देऊन हा खून करवून घेण्यात आला. खुनानंतर उर्वरित १ लाख ९० हजार देण्याचे ठरले होते. 


तत्पूर्वीचं खून करणाऱ्या दोघांना आणि मध्यस्थाला अटक करण्यात आली. त्यानंतर कांबी येथून खुनाची सुपारी देणाऱ्या पत्नीला अटक केले. याप्रकरणानंतर अनेकांना धक्का बसला आहे.