नागपूर : महात्मा गांधीजी यांच्या तत्वावर चालण्याचं काम आम्ही करत असून महात्मा गांधींचं तत्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्ही करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नागपुरात पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह ऊर्जामंत्री चंद्रेशखर बावनकुळे आणि स्थानिक आमदारांसह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


दरम्यान, महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पावन झालेल्या वर्ध्यामध्ये काँग्रेसनं आज निवडणूक प्रचाराचं रणशिंग फुंकलं. जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून पदयात्रा करत पक्षाध्यक्ष राहुल गांधींसह पक्षाचे तमाम नेते सभास्थानी होते. त्यानंतर झालेल्या सभेत राफेल खरेदीपासून ते नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महागाई अशा सर्व मुद्द्यांवरून गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ४ वर्षांपूर्वी जनतेनं मोदींच्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. पण आता भाजपाची गाडी पंक्चर झाली असून काँग्रेस लोकांच्या मनातला आवाज ऐकून सुराज्य आणेल, असं आश्वासनही गांधींनी यावेळी दिलं.