मुंबई : राज्यात 1 जानेवारी ते 03 सप्टेंबर, 2017 या कालावधीत 496 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सध्या 486 स्वाईन फ्लू बाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 3 हजार 716 रुग्णांवर उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारा : स्वाइन फ्लू मुळे भंडा-यातील 38 वर्षीय संतोष माने यांचा झल्याची घटना घडली. मृत संतोष माने हे  सांगली जिल्ह्यातील हातनूर या गावचे होते. मात्र गेल्या  25 वर्षांपासून त्यांचा सोनेचांदीचा व्यवसाय ते भंडारा शहरात करीत होते.


प्रकृती खालावल्यां ते गेल्या 13 दिवसंपासून नागपूरमधील क्रिटिकल केयर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र, उपचरादरम्यान त्यांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला.  आतापर्यंत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे.