COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : पेट्रोल भाववाढीवरून युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधलाय.


२०१४ सालच्या निवडणूक प्रचारातल्या घोषणेची आठवण करून देताना, "अब की बार... नही करेंगे गलती बार बार..." असा नवा नारा त्यांनी दिलाय. त्यांनी नेमकं काय ट्वीट केलंय, ते पाहूया...



मुंबईत पेट्रोल ८४!! २०१४ चा प्रचार विसरलोच... “बहुत हुई महंगाई की मार.. अब की बार..” नहीं करेंगे गलती बार बार. कर्नाटका निवडणुकीनंतर भाव वाढले.. कदाचित डिसेंबरमध्ये परत निवडणुकीसाठी कमी करतील.. पण भारतीय जनतेला वचनं दिली, ती पूर्ण का नाही करू शकत केंद्र सरकार?