मुंबई : मराठा आरक्षण विधेयक सरकारनं मांडल्यानंतर धनगर, मुस्लिम आणि आता लिंगायत समाजही आरक्षणाची मागणी घेऊन रस्त्यावर उतरला आहे. लातूरमध्ये लिंगायत महासंघाच्या वतीने धरणे आंदोलन करून आरक्षणाची मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत लिंगायत आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मात्र तो त्यांनी न पाळल्यामुळे आता राज्यभर आंदोलनाचा इशारा यावेळी लिंगायत समाजातर्फे देण्यात आला.


अन्यथा रस्त्यावर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार लिंगायत आरक्षणाबाबत उदासीन का ? असा सवाल ही यावेळी लिंगायत आरक्षण कृती समितीने उपस्थित केलाय.


राज्यात ०२ टक्के वाणी नावाला ओबीसीच्या यादी क्र.१९० प्रमाणे आरक्षण लागू आहे. 


मात्र लिंगायत समाजाला वाणी, हिंदू लिंगायत, लिंगायत वाणी, वीरशैव अशा विविध नावाने ओळखले जाते. त्यामुळे राज्यातील सरसकट लिंगायतांना ओबीसीचे आरक्षण लागू करावे अन्यथा रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.