मुंबई : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि उपनगरांत पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे. रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे शहरात कुठेही पाणी साचलेलं नाही. त्यामुळे सध्या तरी रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.


मुंबई आणि उपनगरांसह ठाणे, कल्याण डोंबिवलीतही पावसाची संततधार सुरु आहे. पावसाचा जोर कमी असला तरी रात्रीपासून बरसणा-या पावसानं २९ ऑगस्टच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये काहीसं घबराटीचं वातावरण आहे.