Maharashtra Politics: नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ( Nashik Graduate Constituency Election ) निवडणुकीवरुन सुरु असलेल्या वादात धक्कादाय ट्विस्ट आला आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना आधीपासूनच याबाबत महिती होती असे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज  दाखल केला आहे  (Maharashtra Political News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्यजित तांबेंबाबत अजित पवारांना आधीच कल्पना होती.  'सत्यजित तांबेंबाबत मी थोरातांना आधीच सांगितलं होतं असे अजित पवार म्हणाले. अर्ज भरण्याच्या आदल्या रात्रीच साधव केल्याचे अजित पवारांनी सांगितले.  थोरातांनी अजित पवारांकडे दुर्लक्ष का केलं? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. 


राजकारणात योग्य वेळी योग्य धोरणं ठरवून निर्णय घ्यावे लागतात असं सूचक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत केले आहे. तसंच सत्यजित तांबेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा घटनाक्रम जसा दिसतोय तसा नाही. त्याबाबत योग्यवेळी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 


काँग्रेस पक्षानं डॉ. सुधीर तांबे यांना पुन्हा उमेदवारी दिली. मात्र, त्यांनी अर्ज भरलाच नाही. त्यांच्याऐवजी सुपुत्र सत्यजित तांबे अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघातून उभे राहिले. सत्यजित तांबेंना उमेदवार केल्यानं थोरात विरुद्ध तांबे असा मामा-भाच्यांचा गृहकलह सुरू झाला आहे. 


तर, भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याला थोरातांनी फोनवरुन सत्यजित तांबेंना तिकिट न देण्याची विनंती केली. हा आमचा कौटुंबिक मुद्दा आहे, तो कुटुंबातच सोडवतो ही भूमिका त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला फोनवरुन सांगितली. यानंतर सत्यजित तांबेंचा भाजप प्रवेश थांबवण्यात थोरातांनीच महत्त्वाची भूमिका बजावल्याचं आता स्पष्ट होत आहे. मात्र, अधीच थोरात यांनी अजित पवाराच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन तांबे यांच्याशी चर्चा केली असती तर आता हे चित्र निर्माण झाले नसते. 


नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अखेर सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. त्यांनी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याने त्यांची उमेदवारी अपक्ष जाहीर करण्यात आलीय. विशेष म्हणजे आज राबवण्यात आलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपच्या चार उमेदवारांनी अर्ज भरूनही त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला नाही, हे समोर आलंय. त्यामुळे या खेळीमागे भाजपची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात रंगली आहे.