मुंबई : मानधवाढीसाठी पुकारण्यात आलेल्या अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांचे आंदोलन गेल्या दोन आठवड्यापासून सुरु आहे. मात्र, राज्य सरकारने गंभीर दखल न घेतल्याने आज आझाद मैदानात आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जोरदार आंदोलन केलेय. यावेळी सरकारला इशारा देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागण्या मान्य केल्या नाहीतर हा संप पुढे नेण्यात येईल आणि तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अंगणवाडी सेविका, कर्मचाऱ्यांनी आज आझाद मैदानात दिला. गेल्या दोन आठवड्यांपासून संपावर असलेल्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानात जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे.


येथे जमलेल्या कर्मचाऱ्यांनी गावात जाऊन आपली बाजू समजून सांगा. त्यांना आपली बाजू पटेल आणि संपूर्ण गावातील जनता आपल्या पाठीशी उभी राहिले. जनतेला आपल्या पाठीशी उभे केल्याशिवाय आपला संप पुढे जाणार नाही, असा मत यावेळी महिला नेत्यांनी व्यक्त केले.