मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या घोळांची मालिका काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. एकीकडे विद्यापीठाचे निकाल रखडले असतानाच पदवी परीक्षा निकालांमध्येही अपवादात्मक केस आढळून आल्या आहेत. एक हजारांहून अधिक उत्तर पत्रिकांचे बारकोडच मॅच होत नाहीयेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकाच उत्तर पत्रिकेसाठी दोनपेक्षा अधिक बारकोड कसे असा प्रश्न परीक्षा विभागाला पडला आहे. हा सगळा गोंधळ मेरीट ट्रॅक कंपनीनं घातला असल्याचा दावा मुंबई विद्यापीठानं केला आहे.