मुंबई : महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती असताना, मुंबईत मात्र काही गणेशभक्तांनी धुमाकूळ घालायला सुरूवात केली आहे.  मुंबईच्या चिंचपोकळी आणि करीरोड भागात गणेशभक्तांचा धुडगूस पाहायला मिळतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपती आगमन सोहळ्यासाठी विविध भागातून हजारो गणेशभक्तांनी चिंचपोकळी, करीरोड परिसरात मोठी गर्दी केली आहे. रेल्वे स्थानकांमध्ये या तरुणांची जोरदार हुल्लडबाजी सुरु असून, त्याचा नाहक त्रास अन्य प्रवाशांना सोसावा लागत आहे. 


आगमन सोहळ्यातल्या मिरवणुकीसाठी हजारोंची गर्दी झाल्याने लालबाग परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीच्या त्रासालाही सामोरं जावं लागत आहे. 


सण-उत्सव साजरे करत असताना सामाजिक भान जपण्याचीही तितकीच गरज असल्याचं प्रकर्षाने जाणवत आहे.