मुंबई : मुंबईकरांना लवकरच बेस्ट वीज दरवाढीचा झटका बसणार आहे. वीज दरात २ ते ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा प्रस्ताव बेस्ट विद्युत विभागाने ठेवला आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे बेस्टनं दरवाढीचा प्रस्ताव पाठवलाय. एमईआरसीच्या संमतीनंतर १ एप्रिलपासून नवीन वीज दरवाढ लागू होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वीज निर्मिती आणि विद्युत विभागाच्या खर्चात वाढ झाल्याने वीज ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. 


दरम्यान, बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागाकडे २ लाख व्यावसायिक आणि ८ लाख निवासी ग्राहक आहेत. वीज ग्राहकांना वीजपुरवठा करण्यासाठी बेस्ट टाटा पावरकडून ९०० मेगावॅट वीज खरेदी करते.