मुंबई : आपलं स्वत:चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्या बजेटमध्ये आणि स्वस्तात घर मिळावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. कर्ज काढत किंवा आयुष्यभर साठवलेली पुंजी वापरत सामान्य माणूस घराचं स्वप्न पूर्ण करत असतो. पण घराचे व्यवहार करताना काळजीपूर्वक आणि पूर्ण चौकशी करुनच करा. कारण तूमची फसवणूक होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महारेरानं (Maharashtra Housing Regulatory Authority) राज्यभरातील 644 गृहनिर्माण प्रकल्पांना (Housing Project) ब्लॅकलिस्ट (Blacklists)  केलं आहे. या प्रकल्पांना होत असलेल्या विलंबामुळे बांधकाम व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी महारेरानं हे पाऊल उचललं आहे. या 644 गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये मुंबईसह पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सातारा, रत्नागिरी आणि सांगलीमधील प्रकल्पांचा समावेश आहे. 


महारेरानं या गृहनिर्माण प्रकल्पांना घरांची विक्री करण्यास, जाहिरात करण्यास किंवा त्यांच्या प्रकल्पाचं प्रमोशन करण्यास मनाई केली आहे. महत्त्वाचे म्हणजे या गृहनिर्माण प्रकल्पांमधील जवळपास 80 टक्के फ्लॅट आधीच विकले गेले आहेत.


महारेरा’ने काळ्या यादीत टाकलेले प्रकल्प पूर्ण होण्यास बराच विलंब लागत आहे. दिलेली तारीख उलटून अनेक वर्ष झाल्यानंतरही ग्राहकांना घरांचा ताबा मिळालेला नाही. 644 पैकी 16 प्रकल्प हे 2017 सालीच पूर्ण होणे अपेक्षित होते. तर 84 टक्के प्रकल्प 2018 साली पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, बिल्डरांनी चालढकल केल्यामुळे अद्यापही ग्राहकांना घराचा ताबा मिळालेला नाही. 644 पैकी 274 गृहप्रकल्प मुंबईतले आहेत तर 189 प्रकल्प पुण्यातले आहेत. 181 प्रकल्प उर्वरीत राज्यात आहेत.