मुंबई : बंडखोरी, नाराजीचा मोठा फटका बसण्याची भीती वाटत असल्याने भाजपाने अजूनही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपाने सोमवारपासून गुपचूप एबी फॉर्मचे वाटप उमेदवारांना सुरू केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या युतीसाठी खास करून भाजपसाठी निवडणुकीत वातावरण खूपच अनुकूल मानले जात आहे. तेव्हा निवडून येणं सहज शक्य होणार असल्याने अनेक जण अजूनही तिकीट मिळवण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत.


मात्र जागावाटपात अपेक्षित जागा सोडली न जाणे, तिकीट नाकारले जाणे, आयात उमेदवारांना संधी देणे असे प्रकार होत असल्याने पक्षात नाराजी आणि बंडखोरी उफाळून येण्याची  भीती भाजपला आहे. म्हणूनच सर्वात शिस्तीचा पक्ष म्हणून घेणाऱ्या भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर न करता तिकीट वाटप सुरू केले आहे.