मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri by Election) मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रानंतर नवा ट्विस्ट आला होता. अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिंदे गटाने केल्यानंतर आता भाजपने (BJP) या निवडणुकीतून माघार घेतली आहे. राज ठाकरे यांचे पत्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर रविवारी रात्रीपासून भाजपच्या गोटात निवडणुकीतून माघार घेण्याबाबत चर्चा सुरु होती. त्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. भाजप उमेदवार मुरजी पटेल (murji patel) यांचा अर्ज मागे घेत आहोत, तसेच मुरजी पटेल (murji patel) अपक्षही लढणार नाहीत, असं बावनकुळेंनी सांगितलं. (BJP on withdraw its candidate in andheri east bypolls marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुरजी पटेल यांनी 14 ऑक्टोबरला मोठं शक्तीप्रदर्शन करत ऋतुजा लटके यांच्याविरोधात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र राज्यातील राजकीय संस्कृती जोपासण्यासाठी भाजपवर उमेदवार मागे घ्यावा यासाठी दबाव वाढत होता. त्यानंतर आता भाजपने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


"भाजपने मुरजी पटेल यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली आहे. या निवडणुकीमध्ये ऋतुजा लटके (rutuja latke) निवडूण याव्यात म्हणून आम्ही अर्ज मागे घेत आहोत. मुरजी पटेल अपक्ष लढणार नाहीत. भाजपचा उमेदवार पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात जात नाही," असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.


"मी सर्व पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आभार मानते. रमेश लटके यांच्या कामाची पावती म्हणून मला हा सगळ्यांचा आशिर्वाद मिळाला आहे. सर्वांचे मत हेच होते की ही बिनविरोध निवडणूक व्हायला हवी. पण आता शेवटी शेवटी बिनविरोध झाली आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानते," असे ऋतुजा लटके यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, मुरजी पटेल हे भाजपचे माजी नगरसेवक राहिले आहेत. पटेल 2019 मध्ये लटके यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.  राज्यात 2019 मध्ये शिवसेना-भाजप यूती जाहीर झाली होती. त्यामुळे अंधेरी पूर्व विधानसभेची जागा ही शिवसेनेच्या वाट्याला गेली होती. त्यामुळे पटेल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती.


या निवडणुकीत रमेश लटके यांनी पटेल यांचा 16 हजार 965 इतक्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. मात्र उल्लेखनीय बाब अशी की अपक्ष निवडणूक लढवूनही पटेल यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली होती. पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती. पटेल 'जीवन ज्योत प्रतिष्ठान' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांची आपल्या भागावर घट्ट अशी पकड आहे. त्यांना मानणारा आणि जाणणारा असा एक वर्ग आहे.