COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  पंजाबमेलचं इंजिन बंद पडल्याने मध्यरेल्वेची वाहतूक खोळंबली. इंजिनमध्ये दुरूस्तीचं काम सुरू आहे. पंजाबमेलच्या इंजिनामधील बिघाड दूर झाल्यानंतरच खोळंबलेल्या गाड्यांचे मार्ग मोकळे होणार आहे.  


कुठे झालाय खोळंबा 


शहाड-आंबिवली या स्थानकादरम्यान एक्सप्रेस खोळंबली आहे. त्याचा फटका लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यावर दिसून येत आहे. कल्याण-कसारा वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.