मुंबई: रुळाला तडा गेल्यामुळे मंगळवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. घाटकोपर आणि विद्याविहार या स्थानकांदरम्यान रुळाला तडे गेले आहेत. त्यामुळे ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेचे अप आणि डाऊन दिशेचे वेळापत्रक कोलमडले आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. परंतु या सगळ्या गोंधळामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे सीएसएमटीकडे येणाऱ्या जलद गाड्या उशीराने धावत आहेत. 


आज सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दाट धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. जवळपास १० मिनिटे गाड्या उशीराने धावत होत्या. सातत्याने खोळंबा होत असल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.