मुंबई: छोट्य़ा कारणावरून धुसपूस झाली तर बोलणं टाळलं जातं. अगदी सहज मित्र-मैत्रीणींमध्ये देखील असे प्रकार घडतात. मात्र एक धक्कादायक प्रकार मुंबईतील चेंबूर परिसरात घडला आहे. तरुणी न बोलल्याच्या रागातून थेट तरुणानं धारदार शस्त्रानं वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षांच्या तरुणीची दिवसाढवळ्या हत्या झाल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माझ्याशी बोलत नाही याचा राग अनावर झाला आणि तरुणानं संतापाच्या भरात तरुणावर धारधार शस्त्रीनं वार केले. आकांक्षा खारटमल नावाच्या 21 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली आहे. आकांक्षा रिक्षातून प्रवास करत होती. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.


आरोपीनं आकांक्षाचा पाठलाग केला आणि त्यानं तिच्यावर धारदार शस्त्रानं सपासप वार केले. आरोपीने डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करण्यात आले. 21 वर्षांची तरुणी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळली. आकांक्षा गंभीर रित्या जखमी झाली.


आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, घटनेने खळबळ


आकांक्षाला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल करण्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. 


आरोपीवर खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.