मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमध्ये देशातील सर्वात मोठं मेट्रोचे नेटवर्क हे मुंबईत तयार होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले. वडाळा ते CSMT हा मार्ग महत्त्वाचा असेल कारण CSMT हे मेट्रोने थेट ठाणे, घोडबंदर मार्ग ला जोडले जाणार आहेत. या 3 मेट्रो मार्गावर पुढील 10 वर्षात दररोज 41 लाख प्रवास करतील एवढी याची क्षमता असेही ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी पंतप्रधानांनी स्वदेशी मेट्रो कोच आणि नव्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा स्वदेशी मेट्रो कोच मेक इन इंडीया अंतर्गत बनवला आहे. पंतप्रधान मोदींनी मेट्रो रेल्वेचे व्हिजन डॉक्यूमेंटही सादर केले.


एका तिकीट वर सर्व वाहतूक व्यवस्था चालेल प्रवास करता येईल , असं करणारं देशातील पहिले शहर हे मुंबई शहर असेल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले. 2024 मध्ये मेट्रोचे मार्ग पूर्ण होतील ज्यामुळे एक कोटींपेक्षा जास्त लोकं ही मेट्रोने प्रवास करू शकतील असे ते म्हणाले. 




मी त्यांना म्हणालो किती गोष्टीसाठी अभिनंदन करू तुमचे...तुम्ही 370 बाबत निर्णय प्रत्यक्षात आणून दाखवले आहे, चंद्राला गवसणी घातली आहे, तेव्हा तुम्ही ( मोदी ) नजीकच्या काळात अयोध्यामध्ये राम मंदिर उभे करून दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत याची मला खात्री आहे. देशाला दिशा दाखवणारा, सक्षम नेता मोदी यांच्या रूपाने सापडला असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले. 


येणार ते युतीचेच सरकार येणार असे म्हणत करायचे ते दिलखुलासपणे करायचे, आम्हाला सत्ता हवी आहे ती राज्याचा विकास करण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीचा मुद्दाही समोर आणला.