मुंबई : मुंबई काँग्रेसचे प्रतिनिधी सुधांशु भट्ट यांनी शिवसेनेला डिवचलंय. त्यामुळे शिवसेना-कॉंग्रेस असा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची 'खासदार हरवला आहे' अशी होर्डिंग्स जे जे उड्डाणपूल ते मनीष मार्केट परिसरात लावण्यात आली होती. जिथे असतील तिथून लवकर निघून या आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही.... असा आशय त्यावर छापण्यात आलं होतं. 


मतदार संघातील समस्यांबाबत खासदार सावंत निवडून आल्यापासून फिरकले नसल्याचा भट्ट यांनी दावा केलाय. तर शिवसैनिक आणि नेत्यांना यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी हे पोस्टर्स हटवले.