मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus)  पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. डिसेंबरनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. या नियमांबाबत सरकार कठोर निर्णय घेत आहे.  अंधेरी पश्चिममध्ये 32 हॉटेल ,पब रेस्टॉरंट , मंगलकार्यालयांना नोटीस देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल.  रेस्टॉरंट, पब , मंगलकार्यालय मध्ये होणारी गर्दी टाळावी  याकरता पालिका धडक मोहिम करत आहे. ताकीद देऊन ही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई आणि आस्थापन सील केली जातील असे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहेत. 


वरळीमध्ये पालिकेच्या कारवाईला वेग आला आहे. रेस्टॉरंट पब वर कारवाई केली जात आहे. रात्री 17 लोकांवर मास्क न घातल्याने कारवाई करण्यात आली आहे. आता कारवाई पालिका वेगाने करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


राज्यात कोरोनाबाधितांच्या (Coronavirused increased in Maharashtra)  संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 24 तासांत 6 हजार 112 नवे रुग्ण तर 44 कोरोनाग्रस्तांचा बळी गेला आहे. राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे कोरोनाचे नियम कठोर केले जात आहेत. मुंबईतही प्रतिबंधित इमारतींचे नियम (Mumbai Building sealed) कठोर केले आहेत.


गेल्या  24 तासांत 94 इमारती सील करण्यात आल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे सील केलेल्या इमारतींची संख्या 321वर गेली आहे. सील केलेल्या इमारतीमधील रहिवासी घराबाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.