मुंबई : गर्दीनं भरलेल्या मुंबईतल्या रेल्वे अपघाताने आणखी एकाचा बळी घेतला. कोपर आणि दिवा स्टेशन दरम्यान शिव वल्लभ गुजर ह्या तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचं उघड झालंय. गुरुवारी सकाळी ९.०० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. धक्कादायक म्हणजे, रेल्वे अपघाताची ही एका आठवड्यातली ही दुसरी घटना आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अगोदर २२ तारखेला डोंबिवलीची रहिवासी असलेल्या सविता नावाच्या एका महिलेचा गर्दीच्या रेट्यामुळे कोपर ते दिवा याच स्थानकादरम्यान खाली धावत्या रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाला होता. मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय.