मुंबई : सीआरझेडच्या नियमामध्ये बदल करून आता सागरी किना-यापासून बांधकामावरची बंदीची मर्यादा ५०० मीटर वरून ५० मीटरवर आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं मंजूर केलाय. अधिसूचना पर्यटन मंत्रालायाच्या वेबसाईटवर टाकण्यात आली असून त्यावर पुढच्या 60 दिवसात सूचना मागवण्यात आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निर्णयामुळे त्यामुळे महाराष्ट्राला विशेषतः कोकणच्या  शेकडो किलोमीटरच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या जनतेला मोठा दिलासा मिळाणार आहे. नव्या मर्यादेमुळे मुंबई किनापट्टीवरच्या शेकडो जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.  एकट्या मुंबईतच ६२ किलोमीटरची किनारपट्टी आहे. 


सीआरझेडची मर्यादा कमी झाल्यानं आता किमान २००० इमारतींचा पुनर्विकास शक्य होईल. तर डागडुजी अभावी जीव मुठीत घेऊन जगणाऱ्या अनेक कोकणवासियांना आपल्या घरांची बांधकामं करणं शक्य होणार आहे. दुसरीकडे या निर्णयाचा फायदा बिल्डर लॉबीला होण्याची भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केलीय.