मुंबई : दहीहंडी उत्सवांवर आणलेले निर्बंध हटविण्यासाठी सरकारने उच्च न्यायालयात सर्वोत्तम वकील द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सव समन्वय समितीला दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समितीच्या पदाधिका-यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उत्सवातील धांगडधिंगा थांबवा असे आवाहन समन्वय समितीनं आयोजकांना करावे अशीही सूचना ठाकरे यांनी समितीच्या पदाधिका-यांना केली आणि ही सूचना पदाधिका-यांनी मान्यही केली.


दहीहंडी उत्सवावर असलेल्या निर्बंध प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने समितीला उच्च न्यायालयात दाद मागण्याची सूचना सुनावणीदरम्यान केली होती. त्यानुसार ७ ऑगस्टला याप्रकरणी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी आहे. निर्बंधातून दिलासा मिळवण्यासाठी समन्वय समितीचे पदाधिकारी न्यायालयीन आणि राजकीय तसंच सरकारी स्तरावरही प्रयत्न करत आहेत.