मुंबई : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजे उद्या राज्यभरातील मंदिरांमध्ये महाआरती करण्याचा निर्णय मनसेने घेतला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना याबाबतचे आदेश दिले होते. 


पण उद्या महाआरती करण्याचा निर्णय मनसेने रद्द केला आहे. राज्यभरातील मनसेने महाआरतीचा कार्यक्रम रद्द केला आहे. 3 तारखेला रमजान ईद आहे, या दिवशी कोणताही तणाव नको, यासाठी मनसेनं महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.