मुंबई : 'कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागावी, नाना पटोले वेगैरे हे नौटंकीबाज लोकं आहेत' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज कॉंग्रेस कार्यकर्ते फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर आंदोलन करणार होते. कॉंग्रेसने आंदोलन मागे घेतल्यानंतर फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आज कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर आंदोलन सुरू केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याच आक्रमकपणे या आंदोलनाला उत्तर दिले. परंतू कायदा सुव्यस्थेचा प्रश्न लक्षात घेता, पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनाही पोलिसांनी अ़डवले होते. दरम्यान, नाना पटोले यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, कॉंग्रेसवर जोरदार टीका केली.



पंतप्रधानांनी माफी मागण्याची प्रश्नच येत नाही, याउलट कॉंग्रेसने संपूर्ण देशाची मागणी मागितली पाहिजे, हे नाना पटोले वेगैरे नौटंकीबाज लोकं आहेत. यांना कितीही नौटंकी करू देत. त्याचा काही परिणाम होत नाही. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.