मुंबई : ओखी चक्रीवादळाच्या तडाख्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या परिसरातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 
 
शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिलीये.. सुरक्षेच्या कारणास्तव शिक्षण विभागानं हा निर्णय घेतलाय..महाविद्यालयांच्या वेळापत्रकात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओखी चक्रीवादाळामुळे मुंबई शहर तसेच उपनगरात पावसानं हजेरी लावलीये.. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, अंबरनाथमध्येही पाऊस बरसला.. अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘ओखी’ चक्रीवादळ सहा किलोमीटर प्रतितास या वेगाने उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत आहे.