दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : भाजपला रामराम ठोकणारे एकनाथ खडसे आज दुपारी २ वाजता मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत जाणार आहेत. आणखी कोण कोण खडसेंसोबत राष्ट्रवादीत जाणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात विकास कामं रखडलेली आहेत ती पूर्ण करण्यासाठी सरकारची साथ हवी आहे. आपण कुठल्याही पदासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. तसंच नाथाभाऊ ताकदीनं उभा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 


उत्तर महाराष्ट्रात विकास कामं रखडलेली आहेत,  ती पूर्ण करण्यासाठी सरकारची साथ हवी आहे. आपण कोणत्याही पदासाठी राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.


एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपण पक्ष सोडत असल्याचं सांगत भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना, देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध मुद्यांवर आरोप केले आहेत. मला मंत्रीपद गेल्याचा नाही, तर माझं जीवन उद्धस्त करण्याचा जो प्रयत्न केला गेला ते सर्वात वाईट होतं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.