मुंबई : मुंबईतल्या एलफिन्स्टन पूल दुर्घटनेत जखमी झालेल्या अनेक रुग्णांवर जबर मानसिक आघात झालाय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

य़ा दुर्घटनेतील 19 जखमींपैकी 5 जणांना या घटनेचा गंभीर मानसिक धक्का बसलाय. त्यामुळं त्या जखमींवर केईएम हॉस्पिटलमध्ये मानसोपचार सुरू करण्यात आलेत, अशी माहिती डॉ. शुभांगी पारकर यांनी दिलीय.


गेल्या महिन्यात २९ सप्टेंबरला एलफिन्स्टन-परळ ब्रिजवर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल २३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. 


दुर्घटनेतल्या पीडितांच्या शारिरीक जखमा ब-या होतील, पण मानसिक जखमांचं काय ? असा सवाल आता केला जातोय.