मुंबई :  29 सप्टेंबर रोजी घडलेल्या एलफिन्स्टन ब्रीजवरील दुर्घटनेनंतर सर्वसामान्य चाकरमानी आजही धास्तावलेलाच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक आठवड्यानंतर आज पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आणि रेल्वेने प्रवास करणा-या चाकरमान्यांच्या पोटात गोळा आला. रेल्वे प्रशासन कितीही आश्वासन देत असलं तरी मुंबईकरांमध्ये आजही भितीच असल्याचे चित्र दिसले. 


आज संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मुंबईत विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. संध्याकाळी साडेचार वाजता संपूर्ण परिसर अंधारुन गेला होता.