मुंबई : पिकवत्या हातांचा महामोर्चा गेला सुमारे आठवडाभर चालत आहे. भर उन्हातून शिस्तबद्धपणे आगेकूच करत, हा महामोर्चा मुंबईत पोहोचला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या कोनाकोप-यातून या महामोर्चात सहभागी झालेल्या महिला, पुरुषांच्या पायाला, एवढ्या मोठ्या पायपिटीमुळे फोड आले आहेत, तर काहींचे पाय सुजले आहेत. मात्र आपल्या हक्कांच्या मागणीसाठी त्यांचं अविरत चालणं सुरुच आहे. या चालण्यातूनच आपण आपल्या न्याय आणि हक्काच्या वाटेपर्यंत पोहोचू असा या सर्वांना विश्वास आहे.