मुंबई : अल्पभूधारक शेतक-यांना खरीपातल्या पेरणीसाठी १० हजार रुपये देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ही रक्कम तातडीनं देण्यात येईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधीच पेरण्या झालेल्या आहेत, तरीही आवश्यक शेतक-यांना ही रक्कम दिली जाईल. राष्ट्रीयकृत बँकांमार्फत दिल्या जाणा-या या कर्जाची हमी राज्य सरकार घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


अनेक शेतकरी पीककर्ज काढायचे आणि ती रक्कम दुस-या बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकायचे. त्यातून त्यांना दरवर्षी साडे सहा हजार रुपयांचा लाभ मिळायचा, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.