मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा निकालाची ३१ ऑगस्टची डेडलाईनही टळलीय. निकाल जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं ६ सप्टेंबर ही चौथी डेडलाईन दिलीय. पाऊस आणि गणपतीमुळे निकाल रखडले असा अजब दावा मुंबई विद्यापीठाकडून न्यायालयात करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठाच्या या निकालाबाबत न्यायालयानं नाराजी व्यक्त केलीय. ३१ ऑगस्ट ही विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली होती. मात्र अखेरच्या दिवशी अजूनही ८० हजारांपेक्षा जास्त उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यामुळे विचित्र कारण देण्याची वेळ विद्यापीठावर आलीये.