मुंबई : मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरु करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील मशीदींच्या विश्वस्तांच्या शिष्टमंडळासोबत अस्लम शेख यांच्या दालनात सोमवारी पार पडलेल्या बैठकीनंतर अस्लम शेख बोलत होते. या बैठकीला वेगवेगळ्या मशिदीचे विश्वस्त उपस्थित होते.


ऐतिहासिक मिनारा मशिदीचे विश्वस्त आसिफ मेमन यांनी फर्ज नमाजसाठी विशिष्ट वेळा ठरवून देण्याची मागणी केली. तर जामा मशिदीचे शोहेब खतिब यांनी देशभरामध्ये चालू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रिये अंतर्गत मशिदींबरोबरच अन्य धर्मांची धार्मिक स्थळं दर्शनासाठी खुली करण्याची मागणी केली.


अस्लम शेख यांनी धार्मिक स्थळं सुरु करण्याबाबत सरकार गांभिर्यांने विचार करत असून लवकरच याबाबतचा ठोस निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे.