मुंबई : राज्यातल्या थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचं वीज कनेक्शन तोडण्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतक-यांच्या अडचणी लक्षात घेता हा निर्णय़ घेतल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. शेतक-यांकडे 17 हजार कोटींची वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे महावितरणनं वीज जोडण्या तोडण्याचा धडाका लावला आहे.



मात्र याला विरोधकांनी जोरदार विरोध केला. तसेच  विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत वीज जोडण्या तोडण्याचा कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली. 


तसेच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कारवाईला स्थगिती देण्याची घोषणा केली. त्यामुळे आज दिवसभरात सरकारला तिस-यांदा माघार घ्यावी लागली.