मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकताच कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी राज्य शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांची त्यांनी माहिती दिली. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे ८० संशयित रुग्ण दाखल आहेत.  कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभुमीवर सरकारी रुग्णालयात नव्या लॅब सुरु करण्यात येणार आहेत. राज्यभरात दोन दिवसात लॅब आणि डॉक्टरांची संख्या वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


रोज ३५० नमुने तपासणे शक्य होणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. पण संसर्गजन्य आजार इम्युनिटीने कमी करता येतात. शासन आणि डॉक्टरांनी दिलेले निर्देश पाळा. इन्फेक्शन पसरु नयेत यासाठी घेतलेल्या निर्णयांचे पालन करा असे देखील टोपे यांनी सांगितले