मुंबई : येत्या ३६ तासात मुंबई, उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अती मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग चार दिवस पावसानं रत्नागिरी जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. गणरायाच्या आगमनाच्या दिवशी सुरु झालेला पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे.त्यामुळे गणेशभक्त चलबिचल असल्याचं पाहायला मिळतंय.


रायगडमध्ये देखील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इराशा देण्यात आला आहे. नागरिकांना या काळात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.